पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विवाहबाह्य संबंध (ExtraMarital Affairs) - भाग ३

आपल्या पहिल्या पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे - विवाहबाह्य संबंध चांगले की वाईट? त्यांच्याकडे कसं बघावं? त्याच्याशी डील कसं करावं? प्रत्येक विवाहबाह्य संबंध सेक्स पर्यंत पोहचलेले असतातच का? तसे नसेल तर त्यांच्याकडे कसं बघावं आणि त्यांचं नियोजन कसं करावं? - या विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्यांच्यावर बोलायलाच हवं आणि पुढे आपण ते बोलू सुद्धा. पण सध्या तरी आपण विवाहबाह्य संबंधांमध्ये आपल्या वैवाहिक जोडीदाराशिवाय इतर कुणाशी असलेले लैंगिक संबंध या मुद्द्यावर फोकस करत आहोत. यासाठी या लेखात आपण आधी लैंगिक संबंध या विषयावर बोलुयात. आता लैंगिक संबंध याची साधी सरळ व्याख्या करायची झाली तर - कोणत्याही दोन किंवा अधिक प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने एकमेकांशी ठेवलेले लैंगिक संबंध - इतकी साधी व्याख्या होवू शकते. पण फक्त 'लग्न' या एका व्यवस्थेमुळे त्यात अनेक गुंते आणि अनेक प्रकार आपल्याला दिसतात. लग्न व्यवस्थेमुळे एका कोणत्याही व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात लैंगिक संबंधांचे साधारण किती आणि काय काय प्रकार असू शकतात ते पाहूया.- १. लग्नापूर्वी एखाद्या अविवाहित स्त्र...

नाती जपताना - भाग २

समोरच्याच्या फार महत्त्वाच्या नसणाऱ्या तक्रारी व चुका यांच्याबाबत 'मान्य करणे (acceptance)' आणि 'दुर्लक्ष करणे (ignorance)' हे दोन उपाय प्रभावी ठरू शकतात हे आपण मागच्या लेखात पाहिले. थोडा बारकाईने विचार केला तर आपल्या हेसुद्धा लक्षात येईल की आपल्या सर्वांत जास्त तक्रारी या आपल्या जवळच्या माणसांबद्दल असतात. कधी कधी याच साध्या क्षुल्लक चुका इतर कुणाकडून होताना दिसल्या तर आपण त्या सहज दुर्लक्षित करतो; पण त्याच आपल्या जवळच्या व्यक्तीकडून झाल्या तर मात्र आपण त्याबाबत लगेच तक्रारी सुरू करतो. इतरांच्या बाबत व्यक्त होताना आपण अनेकदा त्यांना आवडेल का? त्यांना वाईट वाटेल का? याचा विचार करत असतो, पण तेवढा विचार आपल्या जवळच्या व्यक्तीबाबत व्यक्त होताना कधी करत नाही. आणि म्हणूनच आपल्या जास्त तक्रारी व भांडणे ही जवळच्या व्यक्तीसोबत होतात. कारण तिथे आपण एकमेकांचे मन जपण्याचा तेवढा गांभिर्याने विचार करत नाही. खरंतर एकवेळ हेच अगदी उलट असलं तरी चालू शकणार असते. म्हणजे दूरच्या व्यक्तीसोबत तक्रारी किंवा भांडणे झाली तरी त्याने आपल्या दैनंदिन आयुष्यात फार काही नुकसान होणारे नसते; याउलट जवळच्...

नाती जपताना - भाग १

आपले विचार आणि विचार करण्याची पद्धती आपल्या नात्यात आणि एकूणच आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा रोल निभावत असतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या घटनेबाबत आपण कसा विचार करतोय, यावरून ती घटना आपल्या आयुष्यावर काय परिणाम करील हे ठरत असतं. यामध्ये प्रामुख्याने सकारात्मक आणि नकारात्मक विचार यांचा आपल्या आयुष्यावर, आपल्या नात्यांवर चांगला/वाईट परिणाम होत असतो. म्हणून आज त्याविषयी बोलुयात. नकारात्मक विचार आपल्याला ठरवून मनात आणण्याची गरज नसते. ते आपसूक येतच असतात. समोरच्याच्या चुका किंवा त्यांच्याबद्दल तक्रारी ठरवून विचार करून आठवायची गरज नसते. त्या स्वतःहूनच आपसूक आपल्याला जाणवत असतात. एकूणच नकारात्मकता मनात आणण्यासाठी आपल्याला विशेष काहीच मेहनत घ्यावी लागत नाही; पण याउलट सकारात्मकता मात्र ठरवून आणावी लागते. त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. समोरच्याच्या चुका समजून घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी आपल्याला ठरवून प्रयत्न करावे लागतात. त्यांच्याबद्दल असणाऱ्या आपल्या तक्रारी खरंच एवढ्या महत्त्वाच्या आहेत का? की त्या सहज दुर्लक्षित करण्याइतक्या किरकोळ आहेत? यावर सुद्धा आपल्याल...